Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित
    महाराष्ट्र

    रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित

    सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्याचा विश्वास व्यक्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026No Comments361 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनही त्यांच्याकडून स्वीकारण्यात आले.

    आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यानंतर सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

    रोहित पवार यांनी सांगितले की, 22 जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. तसेच 30 जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने आवश्यक सुधारणा त्याआधी करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

    यावेळी त्यांनी शेतकरी नेते आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी सहभागी करण्याची मागणी केली. या बैठकीत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे नेते, शेकापचे जयंत पाटील तसेच महादेव जानकर यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

    रोहित पवार यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, कर्जमाफीतील दोन महत्त्वाच्या अटींबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास 4 जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. मात्र, सध्या चर्चेला संधी देण्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी रोहित पवार यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif