Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»कांदा महागल्याने घराचे बजेट कोलमडले
    लोकार्थ

    कांदा महागल्याने घराचे बजेट कोलमडले

    वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिक व व्यापारी चिंतेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 25, 2026No Comments185 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात कांद्याचे भाव वाढल्याने सामान्यांच्या घराचं बजेट बिघडलं आहे. मुंबईसहीत अनेक मंडयांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री पडली आहे. कांद्याचे भाव वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. शिवाय होलसेल व्यापाऱ्यांवरही या दरवाढीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे व्यापारी चिंतेत आहेत. कांद्याचे भाव वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत आता ग्राहक कमी प्रमाणात कांदा खरेदी करत आहेत, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

    मुंबईतील मंडयांमध्ये कांद्यांचे भाव वाढल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम किमतीवर पडत आहे. तसेच कांदा महागल्याने लोक गरजेपुरताच कांदा खरेदी करत आहेत. त्यामुळे आर्थिक संकट उभं राहिलं आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

    कांद्याचे भाव वाढल्याने त्याचा विक्रीवरही परिणाम झाला आहे. जे ग्राहक मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करायचे, ते आता कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे कांदा व्यापारावर 20 ते 30 टक्के परिणाम झाला आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

    कांद्याचे भाव वाढले आहेत. बाजारात कांद्याची आवकही कमी झाली आहे. सरकारने एक दिवस बाजारात येऊन व्यापार करून पाहावा. सामान्य लोकांना महागाईचा फटका बसला आहे. घरात बसलेल्यांना महागाईची झळ पोहोचत नाही, असा संताप या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    बाजारात कांदा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एका महिलेने थेट सरकारवरच टीका केली. लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये दिले जातात. अन् आमच्याकडूनच 5 हजार रुपये उकळले जात आहेत, असं या महिलेने म्हटलं आहे. सरकारी योजनांमुळेच दैनंदिन जीवनातीली वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे कुटुंबाचा बजेट सांभाळणं मुश्किल होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

    दरम्यान, नाशिकच्या निफाडमधून गुवाहाटीला कांदा भारून मालगाडी पाठवण्यात येणार होती. पण ही मालगाडी ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे रॅक रद्द करण्याचे कारण देण्यात आलेलं नाही. तर लासलगाव येथून दिल्ली येथे पाठवण्यात येणारा रेल्वे रॅक दाखल झाला आहे. मात्र एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा अद्यापही लोडिंगसाठी न आल्याने याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दुसरीकडे लासलगावहून दिल्लीला कांदा पाठवण्यास ठाकरे गटाने विरोध केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif