Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    हवामान

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    हवामान विभागाचा इशारा : काळजी घेण्याचे आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 13, 2026No Comments929 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषत विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा उच्चांकी तापणार आहे. पुढील 3 दिवसात राज्यातील उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.

    अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी होत चालल्याने उत्तरेकडील राज्यांतून गरम वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत तापमानात तब्बल ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये पारा पुन्हा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

    एप्रिल महिन्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस वातावरणात थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

    हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे तसेच उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कालपासूनच विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव तीव्र झाल्याचे जाणवत असून, येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif