कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अहिरवाडी येतील विलास युवराज चौधरी (वय ४०) हे शेतात गेले होते. परंतु सायंकाळ झाल्यानंतरही ते घरी परत आलेच नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला असता अहिरवाडी शिवारातील गट नंबर ७९ या त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

सततची नापीकी तसेच त्यांचे नावावर युनियन बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. याबाबत नीळकंठ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास रावेर पोलीस करत आहेत. मयत विलास चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.