मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांची काल उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली असून यानंतर कदम यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी शिवसेनेसाठी सर्वस्व पणाला लावलं हे सर्वकाही विसरून उद्धव ठाकरे यांनी मात्र माझी हकालपट्टी केली. नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतांना अत्यंत वाईट वाटलं असेही कदम म्हणाले.
आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवायला पाहिजे असं म्हणत रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलतांना बोलतांना संताप व्यक्त केला. शिवसेना संपवायचे डावपेच शरद पवार आणि अजित पवार यांनी खेळले तरीपण तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधून शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचे मी आभार मानतो असेही कदम म्हणाले.