Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद
    हवामान

    जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद

    मराठवाडा आणि विदर्भ कमी पावसाअभावी कोरडाच
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026Updated:August 5, 2026No Comments43 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने जुलै महिन्यात महाराष्ट्रभर दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस दिला आहे. जुलै हा मॉन्सूनचा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. यंदा या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. मात्र, राज्यभर पावसाचे चित्र सारखे नसून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही सरासरी पावसाची नोंद झालेली नाही.

    राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून येथे सरासरीपेक्षा तब्बल १०४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पुण्यात ७० टक्के, पालघरमध्ये ५६ टक्के, साताऱ्यात ५५ टक्के, जळगावमध्ये ५४ टक्के आणि मुंबईत ३२ टक्के अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, सांगली आणि कोल्हापूरमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

    दुसरीकडे, सिंधुदुर्गमध्ये ३७ टक्के, सोलापूरमध्ये ३० टक्के, बीडमध्ये २८ टक्के, नंदुरबारमध्ये २५ टक्के, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी १९ टक्के कमी पाऊस झाला. जालना, अमरावती, गडचिरोली, लातूर, नांदेड, अहमदनगर, रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि धाराशिवमध्येही पावसाची तूट कायम आहे. दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif