पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील रक्षकनगर येथे आज पहाटे ३ वाजता बिराजदार झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. या आगीत १२ घरे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटना कळताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधला. यानंतर अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
ही आग पहाटेच्या सुमारास लागल्याने ही घटना कळायला विलंब झाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दैव बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण दुसरीकडे मात्र अनेक संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे.