Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉने झळकावले तडाखेबंद शतक
    क्रीडा

    रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉने झळकावले तडाखेबंद शतक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    रणजी ट्रॉफीत भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आज त्याने शतकी खेळी करून निवड समितीला इशारा दिला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे.

    दरम्यान, आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण . पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव टाकण्यात यश मिळविले असता मुशीर खान त्याच्या अर्धशतकाला मुकलेणे तो 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वी 107 चेंडूत 100 धावा करून अद्याप खेळपट्टीवर टिकून आहे.

    पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत मुंबईची धावसंख्या 36 षटकांत 1 बाद 171 एवढी झाली आहे. मुख्तार हुसैन वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला यश मिळाले नाही. पृथ्वीने आपल्या शतकी खेळीत 1 षटकार आणि 15 चौकार मारले. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे. तर, आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. या मालिकेतील संघातील वरिष्ठ खेळाडू आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघात पुनरागमन करत आहेत. कारण अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली होती. ट्वेंटी-20 संघात पृथ्वी शॉला संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र, तसे झाले नसले तरी त्याने शतक केल्याने निवड समितीला आपल्याकडे लक्ष वाढण्यास भाग पडले आहे.

    #pruthvi #ranjitrophy Cricket India Sport
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif