नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गोंधळ राडा केला. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली भरती झाली पाहिजे, अशी मागणीच्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. हे सर्व होत असतांना मात्र फडणवीस विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच तेथून निघाले.
नांदेड कार्यक्रमस्थळी फडणवीसांसमोर विद्यार्थ्यांच्या पोलीस भारती बाबत घोषणा. उपमुख्यमंत्री काहीही न बोलता निघाले. विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज.@Dev_Fadnavis @CMOMaharashtra pic.twitter.com/AYMVy0EGj2
— LOKSHAHI (@elokshahi) September 17, 2022
पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्या लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी फडणवीसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान नांदेडमधील कार्यक्रमात बोलताना फडणवीस विरोधकांना उत्तर देत म्हणाले, की आजच्या दिवशी आरोप करून दिवसाचं महत्त्व करू नका. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या वेळेआधी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान केला असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रीया दिली.