अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची चौथा कसोटी सामना आज अहमदाबाद (Ahmedabad) येथे खेळाला जाणार आहे. हा सामना सर्वांच्याच लक्षात राहणारा असू शकतो, कारणही तसेच आहे. या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.
तर ऑस्ट्रेलिया बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) उपस्थित झाले आहेत.नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशाचे पंतप्रधान दिड तास या सामन्याचा आनंद घेणार आहेत.