नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.
मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
PM @narendramodi reviewed the status of Human Resources in all departments and ministries and instructed that recruitment of 10 lakh people be done by the Government in mission mode in next 1.5 years.
— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर टीका करत असतात. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव निर्माण करत आहेत. एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितलं होतं. तर, फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या सरकारी आकड्यांनुसार १ मार्च २०२०पर्यंत केंद्र सरकारमधील विभागात ८७ लाख पद रिक्त आहेत.