Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»या मुद्द्यावरून कोणत्याही समाजाला आमनेसामने..
    राजकारण

    या मुद्द्यावरून कोणत्याही समाजाला आमनेसामने..

    पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 14, 2026No Comments257 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईत सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरून मनसे आणि जैन मुनी आमने सामने आले आहेत. मनसेने पांढऱ्या पट्ट्यांना प्रचंड विरोध केला आहे. तर जैन मुनींनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागातील वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून कोणत्याही समाजाला आमनेसामने उभे करू नका, असं सांगतानाच असं केल्याने मतं मिळत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनसेला फटकारले आहे.

    मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकासमोर उभे करु नका. दोन्ही समाजांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. असं करून मत सुद्धा मिळत नाही, असा टोला लगावतानाच अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी अनेक लोक बोलत असतात. मुख्यमंत्री म्हणून या मुद्द्यावर उत्तर देण मला गरजेच वाटत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    नॉर्थ कोस्टल रोडवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नॉर्थ कोस्टल रोड हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात वेस्टर्न एक्सप्रेस व्यापणार आहे. मुंबईची ट्रॅफिक ही वेस्टर्न एक्सप्रेस वे वर जाणार असते. हा समांतर आणि सिग्नल फ्री रोड देणे गरजेचे आहे. या ठिकाणी काम दिसत आहे. हा रोडने वांद्रे वर्सोवा सिलिंक जोडला जात आहे. या रोडच्या कामाने अत्यंत वेग घेतला आहे. अशा लाटांमध्ये काम करणे कठीण असते. मात्र वेगाने काम सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिलेला पाठिंबा हे जानकर यांचं प्रेम आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif