पाचोऱ्यात भीषण अपघात, भरधाव पिकअपने उडविले चौघांना

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌.दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन निष्पापांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहे. अपघाताची माहिती मिळताच येथील काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी हे तात्काळ घटनास्थळी दाखल होवून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात उपस्थितांच्या मदतीने जखमींना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई (Mumbai) येथुन बुलढाणा (Buldhana) येथे सफरचंद, के.व्ही. फुड, मोसंबी ने भरलेली महेंद्र कंपनीची पिकअप मालवाहतूक गाडी (क्रं. एम. एच. ४८ बी. एम. ७९४३) ने १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुंबई कडुन बुलढाण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात असतांना महाराणा प्रताप चौकातील श्री. दत्त मंदीराच्य ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागीच पडले. घटनास्थळी अपघातानंतर एकच हाहाकार उडाला व रक्ताचा सडा पडला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना घटनेची माहिती मिळताच सचिन सोमवंशी यांनी घटनास्थळ गाठत तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलु पाटील यांना कॉल करुन जखमींना पुढील औषध उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तर गाडी चालक यांच्यावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत असतांना कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भोसले, पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांनी जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले.

या अपघातात विनोद बारकु पाटील(वय – ३५) कुंदन सुनिलसिंग परदेशी (वय – १७) रा. पुनगाव ता. पाचोरा तर अमोल वाघ(२६) हा पाचोरा येथील आहे तर वसंत भाईदास पाटील (वय – ४२) हे जखमी झाले तर विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघे पायाचे जागेवर तुकडे पडले होते. दरम्यान पिकअप चालक मालक पवन रतनसिंग गोटी रा.वसई व क्लिनर सावन भरतसिंग गोटी रा.वसई या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात घटनास्थळी असलेल्या मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ ई. डी. ३४९२ हिचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लग्नासाठी आले आणि पाय गमवुन बसले.

दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळी एका खासगी लक्झरी ने पाचोरा येथे आले होते. महाराणा प्रताप चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर घटनास्थळी पत्ता विचारत घटनेतील जखमी अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईक यांची वाट बघत असतांनाच अचानक गाडीने त्यांचे दोघे पाय उडवले. मात्र यात अमोल चे पाय वाचले. लग्नासाठी आले आणि दोघे पाय गमावले असेच म्हणावे लागेल. अपघात जखमी विनोद पाटील हाच घरात कर्ता पुरुष आहे त्याचे दोघे पाय गमवावे लागल्याने त्याचा तात्काळ हॉस्पिटल चा खर्चासाठी वाळु वाहतुकदार बेरोजगार तरुणांनी यांनी पैसे जमा केले आहेत.

डॉक्टरांच्या रक्तदानाने वाचला प्राण
यात विनोद पाटील यासाठी ए.बी. पॉझिटिव्ह रक्तगट या दुर्मिळ गटाचे इतक्या सकाळी कुठुन मिळणार म्हणून डॉ. सागर गरुड आणि कॉंग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी लिलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांना कॉल केल्यावर त्यांनी तात्काळ रक्तदान केले आणि विनोद पाटील ला तात्काळ रक्त देण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड, डॉ. सचिन वाघ, डॉ. प्रवीण देशमुख, नरेश पाटील, विजय पाटील यांनी जखमींना उपचारासाठी शर्यतीचे प्रयत्न केले.

अंतुर्ली फाटा ते जळगांव चौफुलीपर्यंत स्पिड ब्रेकर व वेग मर्यादेच्या फलकाची मागणी
सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी निघणाऱ्यांना या अपघाताची भिती वाटायला लागली असुन अंतुर्ली फाटा ते जळगाव चौफुली पर्यंत ठिक ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि वेग मर्यादा ठरवली गेली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचेसह माॅर्निंग वाॅकसाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.