नवी दिल्ली लोकशाही न्युज नेटवर्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना धडा शिकवला. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयांनाही टार्गेट करण्यात आलं.
https://x.com/ANI/status/1920352549732843741
ऑपरेशन सिंदूरनंतर आज दिल्लीत संसदेत सर्व पक्षीय बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
पाकिस्तानविरुद्ध अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. दरम्यान, सीमेवर परिस्थिती वेगानं बदलत असल्याची माहिती सर्वपक्षीय बैठकीवेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी ५५ वर्षांनी संयुक्त मोहीम राबवत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडलं. जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाला उद्ध्वस्त करण्यात आलं. मुरिदके आणि बहावलपूर हे हाफिज सईद आणि मसूद अजहर यांचे तळ होते. या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला.