शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी – गुलाबराव वाघ

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज रोजी एका निवेदनाव्दारे केली.
धरणगाव तालुक्यातील व परिसरात मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले असून इतर पिकांचेही बरेच नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीमुळे हिरावला गेला असून, कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाएवढे उत्पादन निघणेही कठीण आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी डबघाईस आला, त्यामुळे त्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. अतिवृष्टीच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात. याकरिता पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच गुरांवर लंपी आजार आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत, त्यावर उपाय योजना म्हणून लसीकरण व फवारणी लवकरात लवकर करण्याचे निवेदन शिवसेना सहसपर्क गुलाबराव वाघ व शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले. यावेळी उपस्थित लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, जितू धनगर, ऍड शरद माळी, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, मा.जि.प.सदस्य जानकीराम पाटील, दीपक सोनवणे, नाना ठाकरे, देशमुख, धिरेंद्र पुरभे, भरत महाजन, कृपाराम महाजन, परमेश्वर महाजन, राहुल रोकडे, रवी जाधव, कमलेश बोरसे, गजानन महाजन, नंदू पाटील, आनंद धनगर, भीमराव धनगर, गोपाल चौधरी, सुखदेव चौधरी, पप्पू सोनार, पंकज महाले, जयेश महाजन, विलास पवार यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.