Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    हवामान

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    उष्णतेची लाट येणार : हवामान खात्याचा इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments44 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर, आता निसर्गाचे दुसरे टोक पाहायला मिळणार आहे. पावसाच्या सरींनी गारवा अनुभवणाऱ्या जळगावकरांना आता ‘हिट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्यानं आजपासून सहा दिवस जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत दिले आहे.

    गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात तापमान 35 अंशावर आले होते. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे जळगावकरांना उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळाला होता. मात्र, अवकाळीचे संकट दूर झाल्यानंतर आता जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. गेल्या 24 तासात जळगावचे कमाल तापमान 36.6 अंश इतके होते. तर किमान तापमान 20 अंश इतके होते. दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत असताना, रात्री मात्र वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. दरम्यान जिल्ह्यात आजपासून उष्णतेचा तडाखा वाढणार आहे.विशेष रात्रीच्याही उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान खात्याच्या अंदाजनुसार दि.16 एप्रिलपर्यंत जळगावचा पारा 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजस्थानातील थार वाळवंटाकडून येणारे गरम आणि कोरडे वारे उत्तर महाराष्ट्रात वेगाने प्रवेश करत असल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. या उष्ण वाऱ्यांचा परिणाम जळगाव जिल्ह्यासह परिसरावर जाणवू लागला असून दुपारच्या वेळेत उकाडा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif