औरंगजेबाची कबर महाराष्ट्राबाहेर फेका

नवनीत राणांची राज्य सरकारकडे मागणी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता, असं म्हणत त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल होता.  या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राज्यातील वातावरणही चांगलेच तापलं असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच माजी खासदार नवनीत राणा यांनीही यावरून अबू आझमी यांना लक्ष्य केलं आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनीही यावरून अबू आझमी यांना लक्ष्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. तसेच राज्य सरकराने छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून महाराष्ट्राबाहेर फेकावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अबू आझमी यांनी औरंगजेबाबत जे विधान केलं आहे, त्यानंतर त्यांचे निलंबन करत त्यांना धडा शिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलं आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचे विचार चालणार नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या सरकारने केला आहे, आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. आमची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक विनंती आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राला औरंगजेबाचे विचार चालत नाही, त्याचप्रमाणे त्याची कबरही चालत नाही. त्यामुळे सरकारने छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून महाराष्ट्राबाहेर फेकली पाहिजे”, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

अबू आझमीचे वक्तव्य 

दरम्यान, अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, ”आत्ता सगळा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली आहेत. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”, असे ते म्हणाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.