अवकाळी पावसामुळे नंदुरबारमध्ये चाऱ्याची समस्या बनली अधिक बिकट 

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चार खराब झाला आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सरकारने दिलासा द्यावा. शासकीय स्तरावरून चार उपलब्ध करून करून देण्यासाठी प्रयत्न होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज माजी आमदार ऍड. के. सी. पाडावी यांची मागणी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जागवावी कशी ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करीत आहे. मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत असल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे.

पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे; अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.