जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टेम्पोचे टायर ब्लर झाल्याने बॅलन्स जाऊन लेनमध्ये घुसला. त्याच वेळी नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला एका कंटेनरने दिलेल्या धडकेत बस पलटी होऊन ३ जण मृत्यूमुखी पडले तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.
मृतांमध्ये अमळनेरचे पियुष पाटील आणि त्यांच्या पत्नी वृंदा पाटील यांचा समावेश आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
पियुष व वृंदा मकर संक्रांतीनिमित्त घरी आले होते व रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईकडे परत निघाले होते. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा उच्चशिक्षित असून माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. अपघातात त्यांची अडीच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे व तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या निधनाने मारवड गावात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या अपघातात जखमींमध्ये चोपडा येथील एकाचा समावेश झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींमध्ये अदान खान (वय 28, रा. धुळे), समीना सय्यद (वय 35, रा. कल्याण), माया कटरे (वय 55, रा. कल्याण ), साई सागर यदिंगे (वय 3, रा. कल्याण ), महेंद्र यदिंगे 52, रा. कल्याण ), परि सागर यदिंगे (वय 5, रा. कल्याण), रेहमान इमदादूर (वय 32, रा. आसाम), शिफा सय्यद( वय 34, रा. कल्याण) सैय्यद शरिक (वय 38, रा. कल्याण), अरुणाबाई हयसिंग( वय 40, रा. कल्याण ), देविदास बैसाने(वय 52, रा. अमळनेर), अनिल गुप्ता (वय 32, रा. नागपूर), किशोर कुमार पाटील (वय 50 , रा. अमळनेर ),मुकेश बैसाणे (वय 45, रा. चोपडा ), ज्ञानेश्वर वानखेडे(वय 47, रा. बोरशेटी), जय लक्ष्मी शेट्टी (वय 20, कांदिवली) यांचा समावेश आहे.
जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.