लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज बुधवारी मांडला जात आहे. तब्बल ४ दशकानंतर भाजपच्या ताब्यात मुंबई महापालिका गेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पालिकेचा अर्थसंकल्प जनतेसमोर येण्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. विकासकामांसाठी ठेवी मोडणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेकडे एकूण ८१ ४४९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवीपैकी ३६ हजार ६२३ कोटी रुपये विविध प्रकल्पासाठी वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. ठेवीतील ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दायित्वापोटी राखीव आहेत. त्यामुळे त्या ठेवी मोडता येणार नाहीत. मात्र, ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेचं वर्ष २०२६-२७ या वर्षासाठी अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेत सादर केलं. पालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटींवर गेलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या अर्थसंकल्पात ८.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. गेल्या वर्षीय मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ७४ हजार ४२७ कोटी रुपये इतका होता.
मागील आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ४३१५९.४० कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते आता १४६७७८.१२ कोटी असे सुधारण्यात आले आहे. या अंदाजामध्ये ८.३८% म्हणजेच ₹३६१८.७२ कोटी इतकी वाढ झाली आहे. ३१.०१.२०२६ पर्यंत ३४०३३.५६ कोटी रुपये इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालं आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न ₹५१५१०.९४ कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १९.३५% ने जास्त आहे.

