नदीमध्ये पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

जळगाव ;- नदीपात्रात पोहत असतांना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवीघटना मंगळवारी ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धामणगावजवळील तापी नदीच्या पात्रात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र आत्माराम कोळी (वय-३०, रा. जैनाबाद,जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शहरातील जैनाबाद परिसरातील रविंद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करत होता . सोमवारी २९ मे रोजी रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रविंद्र कोळी हा मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला. रविंद्र हा एकटाच पाण्यात पोहण्यासाठी उतरला तर त्याचे दोघ मित्र काही अंतरावर बसलेले होते. पाण्यात पोहत असतांना अचानक रविंद्रला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी नदीपात्राच्या दुसर्‍या तिरावर असलेल्या काही जणांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करून त्याच्या मित्रांना रविंद्र बुडत असल्याचे सांगितले. त्यांनी लागलीच रविंद्रला पाण्यात बाहेर काढले. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई आहे. याघटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ लोखंडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.