लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमच्या अनेक व्यक्तिवर कारवाईची टांगती तलवार असून आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसले नाही का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करून सरकारवर घणाघाती टीका केली. कल्याणचे विजय साळवी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत.
त्यांना तडीपारीची नोटीस दिली आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. कारण देशात सगळ्यात असुरक्षित राज्य महाराष्ट्र असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, राजन साळवी, वैभव नाईक आणि नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस आली आहे. गैरव्यवहाराची आम्ही अधिवेशनात प्रकरणे काढली ती एसीबीला दिसत नाही. आमच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे चौकशा केल्या जात आहेत. उद्या आमच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. सगळ्यात असुरक्षित राज्य या सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आहे. कुणालाही कधीही तुरुंगात टाकलं जाईल. राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देतायेत. पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होते . पोलिसांची प्रतिष्ठा जगामध्ये होती. राजकीय स्वार्थासाठी आमच्या महाराष्ट्राचे नाव बदनाम करू नका. अशा शब्दांमध्ये राऊत यांनी खडे बोल सुनावले आहे.