Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»रेल्वे बोगद्यामध्ये साचते पावसाचे पाणी, रेल्वे अभियंता यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ?
    जळगाव जिल्हा

    रेल्वे बोगद्यामध्ये साचते पावसाचे पाणी, रेल्वे अभियंता यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2023Updated:June 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रावेर येथून तामसवाडी मार्गे मोरगाव, खिरवड, नेहते व दोघे तसेच अटवाडे या गावांना जातांना मध्य रेल्वेची रेल्वे लाईन ओलांडून जावे लागते. या ठिकाणी पूर्वी पासून एक रेल्वे गेट अस्तित्वात होते. काही महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी व मोठ्या अवजड वाहनांना सुद्धा येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग काढलेला आहे. परंतु हा भुयारी मार्ग वाहनधारकांच्या जिव्हारी लागलेला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी नेहमी साचत असते पावसाळा असो वा नसो अवकाळी पाऊस जरी झाला तरीसुद्धा या ठिकाणावरून मोटर सायकल तसेच इतर वाहने चालवणे कठीण होऊन जाते.

    याआधी सुद्धा रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक लोकशाही मधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने त्यावर अजून तोडगा काढलेला नाही या ठिकाणावरून रात्री अपरात्री जाताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. तरी कृपया रेल्वे प्रशासनास विनंती आहे की त्यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा. व प्रवाशांना भयमुक्त करावे. असा सूर सुज्ञ नागरिकांमधून निघत आहे. तसेच झालेल्या कामाबद्दल रेल्वे अभियंता यांच्या कार्यक्षमतेवर जाणारे येणारे प्रवासी आपापली मतं मांडताना दिसत आहेत. याला कारणही तसेच आहे रेल्वे म्हटले म्हणजे काम आणि कामाची क्वालिटी यात कुठलीही शंका नाही. परंतु या ठिकाणी असे काय आहे की ते अजून मार्गी लागण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे. कृपया लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची समस्या दूर करावी.

     

    morgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif