जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक झाल्यानंतर आज मुंबई (Mumbai) महानगरपालिकतील स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे (Shiv Sena) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली. यासंदर्भात राजकीय मंडळींनी प्रतिक्रिया व्यक्त आरोप प्रत्यारोप केले आहेत. तसेच यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
युट्युब लिंक👇
गुलाबराव पाटील म्हणाले, की एलसीबीसारखी आता ईडी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ईडीने (ED) केली आहे. जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या, तसेच ईडीचा गैरप्रकार केला जात आहे. अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.