बांबरुड खुर्द येथे विहीरीत पडुन सैनिकाचा मृत्यु

0

बांबरुड खुर्द येथे विहीरीत पडुन सैनिकाचा मृत्यु

भडगाव प्रतिनिधी

येथील जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा जि. जळगाव येथील रहिवाशी व आसाम रायफल शिलॉंग येथे नोकरीस असलेला रविंद्र पंडीतराव पाटील वय ३८ वर्ष हा सैनिक, जवान शेतात पिकांना पाणी भरायला गेला असता विहीरीत पाय घसरुन पडल्याचा संशय नातेवाईकांना असुन त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे

. ही घटना दि. २४ रोजी बांबरुड खुर्द शिवारातील शेतात सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला डाॅ. पंकज जाधव वैदयकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय भडगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेने परीसरात हळ हळ व्यक्त होत आहे.

भडगाव ग्रामिण रुग्णालयात रविंद्र पाटील या जवानास मृत अवस्थेत आणले असता डाॅक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. मयताचे शव विच्छेदन करुन शव नातेवाईकांच्या ताब्यात सायंकाळी देण्यात आले. मयत जवानाचे शव गावात आणताच नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला. राञी उशीरापर्यंत मयतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत माहिती अशी कि, भडगाव येथुन जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवाशी व आसाम रायफल सिलांग येथे नोकरीस असलेला सैनिक रविंद्र पंडीतराव पाटील वय ३८ वर्ष हा जवान दि. २४ रोजी सकाळी ९ वाजता शेतात पिकांना पाणी भरायला जातो असे घरी सांगुन गेला होता. त्याचा पाय घसरुन विहीरीच्या पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु झाल्याचा संशय नातेवाईकांना आहे. मयताचा चुलत भाऊ गोपाल पाटील हा दि. २४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात गेला असता विहीरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने रविंद्र पाटील हा विहीरीच्या पाण्यात पडला असावा असा संशय आला. यावेळी नागरीकांची मोठी गर्दी जमली होती. विहीरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने नातेवाईकांना संशय बळावला कि रविंद्र पाटील हा विहीरीच्या पाण्यातच पडला असावा असा संशय नातेवाईकांना आला. आणि नातेवाईकांनी विहीरीच्या पाण्यात सर्वञ शोधाशोध केली असता प्रेत सापडले. मयतास भडगाव येथील ग्रामिण रुग्णालयात आणले असता त्यांना मयत घोषीत केले. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी करण्यात आले.राञी उशीरापर्यंत या मयतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयताच्या पश्चात आई, पत्नी,१ भाऊ, १ मुलगा, १ मुलगी असा परीवार आहे.तो फेब्रुवारी २०१० मध्ये आसाम रायफलमध्ये नोकरीला लागला होता. दि. २९ फेब्रुवारी रोजी सुटीवर घरी आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.