Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मंत्री गिरीश महाजन यांना नगराध्यक्ष सुनील काळे यांचे साकडे
    राजकारण

    मंत्री गिरीश महाजन यांना नगराध्यक्ष सुनील काळे यांचे साकडे

    वरणगाव शहरात भूमीत गटार प्रकल्पासाठी नगराध्यक्ष सक्रीय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026No Comments182 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील भूमिगत गटार प्रकल्प योजना तातडीने मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी करत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन साकडे घालण्यात आले.

    यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन वरणगाव शहरातील भूमिगत गटार योजना तातडीने मार्गी लावावी, अशी विनंती केली. भूमिगत गटार प्रकल्प योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करून त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या असून तो राज्याच्या एस.एल.टी.सी. समितीसमोर सादर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर एस.एल.टी.सी. समितीने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

    शहरातील रस्ते पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमुळे खोदलेले आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटार योजना राबवून जनतेला मूलभूत सुविधा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. वारंवार नवीन रस्ते तयार करून पुन्हा खोदकाम केल्यास शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे सध्याच भूमिगत गटार प्रकल्प मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मार्ग काढून वरणगावकरांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

    राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांना निवेदन देऊन नगराध्यक्षांनी साकडे घातले. यावेळी जनसेवक अजमल खान, जनसेवक फजल शेख, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश निमकर यांच्यासह कार्यकर्ते मुंबई मंत्रालय येथे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif