जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना देखील इशारा दिलाय.
गिरीश महाजन हे आंतरवलीमध्ये येऊन वेळ मागून घेऊन गेले होते. त्यांनी आता वेगळी विधानं करू नयेत. मराठा समाजाला नडू नये. आंतरवाली येथे भेटीदरम्यान ते काय बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग, शूटिंग सगळं आहे. राज्यभरात व्हायरल करू. संकटमोचक आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास होता म्हणून मंचावर येऊ दिलं. त्यांनी फडणवीस साहेबांचं नाव खराब करू नये; असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे.
त्यांनी मराठा आरक्षणावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आणि विदर्भातील मराठा एक होत नाही; अशी शंका राज्यात होती आणि ती पसरवली जात होती. पण खानदेशातील मराठा एक आहे हे दिसून आले. विदर्भात देखील ते आज दिसेल, असे जरंगे पाटील यांनी म्हटले आहे.