अंगावर भिंत पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कारखान्यातील नाली खोदकाम सुरू असताना पाठीमागे असलेली भिंत ही अचानकपणे कोसळल्याने उत्तर प्रदेशातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथील औरंगाबाद रस्त्यावरील सूर्य छाप पटेल तंबाखू कारखानाच्या एच. एच. पटेल कंपनीत १९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. तर एक मजूर जखमी झाला . त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील विनीत कुमार (क्य ३५), मोहम्मद अली फकीर अली (वय ४०), लतीब रहिम (वय ३३) अशी मृतांची नावे आहेत.

गटारीचे खोदकाम करत असताना अचानकपणे पटेल कंपनीची संरक्षण भिंत या चार ही मजुरांच्या अंगावर पडली. रविवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या दुर्दैवी अपघातात विनीत कुमार, मोहम्मद अली फकीर अली, लतीब रहिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक मजूर या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्यावर चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास एपीआय सागर ढिकले करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.