पाय घसरून विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील मोहाडी शिवारात मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली . याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरला योगेश राजपूत वय-३०, रा. मोहाडी ता. जामनेर जि. जळगावअसे मृत महिलेचे नाव आहे.

सरला योगेश राजपूत यांच्या शेतात तूर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला कामगारांना पाणी घेण्यासाठी त्या विहिरीजवळ गेल्या होत्या. पाणी काढत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उशिरापर्यंत सरलाबाई या पाणी घेऊन आल्या नाही म्हणून महिला कामगार विहिरीत जवळ आले असता डोकावून पाहिले तर सरला राजपूत या पाण्यात बुडून मयत झालेल्या होत्या. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चांदा यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील तपस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.