पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात थंडीचा (Maharashtra Weather) कडाका वाढणार आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात आजपासून पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे.
दरम्यान राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच मराठवाडा (Marathwada) भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या वरील भागात ही स्थिती तयार झाली होती.
विदर्भातील (Vidarbha) सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी घट कायम होती. त्यामुळे या भागात थंडीचा कडाका कायम होता. आता दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात मंगळवारपासून थंडी वाढू लागली आहे.
प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस)
गोंदिया – २९ ११.२
वर्धा – ३०.२ १२
नागपूर – ३०.२ ११.३
जळगाव – ३१.५ १२.३
पुणे – ३२.३ १५
कोल्हापूर – ३०.५ २२.८
औरंगाबाद – ३१.३ १२.३
नाशिक – ३१.१ १३
सांगली – ३१.२ २१.८
सातारा – २९.६ २०.६
सोलापूर – ३३.८ १८.५
मुंबई – २९.२ २०.८
रत्नागिरी – ३२ २२.२