धक्कादाय; मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघालेल्या कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू…

0

 

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार पलटी झाली, त्यामुळे हा अपघात झाला.

चाकूर येथील रहिवासी कुटुंब मुलीच्या सोयरीकीच्या कामांसाठी औरादकडे जात होते. यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पटली झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भिषण होता की कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली आहे. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे,  लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी हे कुटुंब निघाले होते, त्याच वेळी काळाने घाला घातला.

Leave A Reply

Your email address will not be published.