जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहराजवळ गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावरील नागाई जोगाई मंदिराजवळ आज रविवारी शिवाजी नगर परिसरातील मुलांनी ट्रीप काढली होती. यावेळी पोहोण्यासाठी गेलेले चार मुले पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा शोध सुरु आहे. वाचविण्यात आलेल्या तिघांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील मिथिला अपार्टमेंटमधील मुलांनी कांताई बंधाऱ्यावर आज ट्रीप काढली होती. यावेळी एकाचा पाय घसरल्यामुळे त्याचा पाण्यात तोल गेला. त्यावेळी त्याला वाचवण्यात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले. समिक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) असे वाचवण्यात आलेल्याचे नाव असून तर नयन योगेश निंबाळकर (वय १४) हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध अद्याप सुरु आहे
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.