कल्याणमध्ये चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याण शहर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्यामोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. कल्याणमधील कोळसेवाडी परिवारात एका पान टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना ताजी असतांना आता असाच एक आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याणमध्ये भररस्त्यात एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर, त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून, चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून हजारो रुपयांची लूट करण्यात आली आहे. नीरज भोलानाथ यादव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कसून तपस सुरु केला आहे.

घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत होता, तितक्यात…

नीरज मूळचा अंबरनाथचा असून कल्याणमध्ये कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तो घरी येण्यासाठी निघाला असता, तिथे तिघेही आरोपी आले आणि त्यांनी जबरदस्तीने नीरजला त्यांच्या बाईकवर बसवले. नीरज तिथे एकटाच असल्याचे तो विशेष प्रतिकार करू शकला नाही. आरोपींनी त्याला जबरदस्तीने म्हारळ गावाजवळ टेकडीवर नेले आणि तेथे त्याला बेदम चोप दिला.

एवढेच नव्हे तर तीनही आरोपींना त्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि नीरज त्याच्याकडे असलेले डेबिट कार्ड ताब्यात घेऊन जवळच्याच एटीएममधून पैसे काढले. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पाकिटातील रोख रक्कमही आरोपींनी हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. हल्लेखोरांच्या ताब्यातून सुटल्यावर नीरजने कसंबसं महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं आणि तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार कथन करत तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.