अमरावती , लोकशाही न्यूज नेटवर्क
कांद्याला अत्यल्प भाव मिळत असून, शेतकऱ्यांची भावना मला कळू शकते कधी कधी मंदी येते, पण कधी कधी चांगला दर मिळतो . भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे आतापर्यंत 28 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. अजूनही कांद्याची खरेदी करु असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सहा महिन्यात या सरकारने जे शेतकऱ्यांना पैसे दिले ते याआधी कोणत्याही सरकारने दिले नसल्याचे सत्तार म्हणाले. अतिवृष्टीमुळं नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात आली. उरलेले 28 हजार शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील असेही सत्तार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना खूप मदत आम्ही करणार आहोत. फक्त घोषणा बाहेर करता येत नाही. लवकरच शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार असल्याचे सत्तारांनी सांगितले .