Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»अहंकार व असत्यावर सत्याचा विजय – ना. गिरीष महाजन
    जळगाव जिल्हा

    अहंकार व असत्यावर सत्याचा विजय – ना. गिरीष महाजन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025Updated:October 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहंकार व असत्यावर सत्याचा विजय – ना. गिरीष महाजन

    भव्य रावण दहन सोहळ्यात जनतेचा उत्स्फूर्त सहभाग

    जामनेर /प्रतिनिधी – सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य रावण दहनाचा कार्यक्रम श्रीराम मित्र मंडळातर्फे शहरातील दसरा मैदान, मंमादेवी जवळ मुख्य मैदानावर विजयादशमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रावण दहन सोहळ्यात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा लोकप्रिय नेते ना. गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “रामायणाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. अहंकार, अन्याय, असत्य यांचा शेवटी पराभव होतोच. सत्य, सदाचार आणि धर्म नेहमीच विजयी होतात.”

    कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या ४१ फूट उंचीच्या रावण प्रतिकृतीला अग्नी प्रज्वलित होताच वातावरण “जय श्रीराम” च्या गजराने दुमदुमून गेले. फटाक्यांची रंगबिरंगी आतिषबाजी, रोषणाई व टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

    ना. महाजन यांनी आपल्या भाषणातून युवकांना आवाहन करताना म्हटले की, आज समाजात भ्रष्टाचार, अन्याय, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा या रावणाचे विविध रूप दिसतात. या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक तरुणाने ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा वापर करून समाजाचा चेहरा बदलला पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, सण-उत्सव हे केवळ आनंदाचे नसून ते सामाजिक बांधिलकी व सद्गुणांचा प्रसार करणारे आहेत.

    रावण दहन सोहळ्यानंतर रंगमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाट्य-प्रसंग, पारंपरिक नृत्य तसेच देशभक्तीपर गीते सादर केली. महिलांनी पारंपरिक लावण्या तर युवकांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्यरचना सादर केल्या.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मैदानाची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, तसेच सुरक्षेची काटेकोर व्यवस्था यामुळे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.

    शहरातील नागरिकांनी रावण दहन प्रसंगी “अहंकाराचा अंत, सत्याचा विजय” हा संदेश लक्षात ठेवून आनंदोत्सव साजरा केला.
    ना. गिरीष महाजन यांच्या प्रेरणादायी भाषणाने युवकांमध्ये नवी ऊर्जा व सकारात्मकता निर्माण झाली. विजयादशमीचा सोहळा हा फक्त धार्मिक वा पारंपरिक नसून सामाजिक संदेश देणारा ठरावा, अशी भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली.

    रावण दहन प्रसंगी व्यासपीठावर माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, माजी नगरसेविका संध्या पाटील, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी उपनगराध्यक्ष महेंद बाविस्कर, माजी नगरसेवक बाबुराव हिवराळे, मुश्ताक शेठ, आतिश झाल्टे, दिपक तायडे, श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोहर माळी, सुहास पाटील, उल्हास पाटील, यांच्या सह तालुका भरातील तसेच शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

     

     

    girish mahajan Jamner RAVAN DAHAN
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026

    अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif