वीज पडून तीन म्हशी दगावल्या

शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

अवकाळी पावसासह वादळाने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातल्याने नागरीकांचे तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.  शहरात देखील रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक वीजेच्या कडकडाटात झालेल्या धुवाधार पाऊस झाला.

शहरातील जामनेर पुरा भागातील शेतकरी विजय किसन परदेशी यांचा गुरांचा गोठा असुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पशुधन बांधलेले होते. अचानक वीज  कडकडुन ती वीज गोठ्यात कोसळली. त्या विजेमुळे गाभण असलेल्या तीन म्हशींचा मृत्यू झाला. दुध व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या विजय परदेशी यांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

उदरनिर्वाहाचे हातचे पशुधन डोळ्यासमोरच दगावल्याने त्यांचे सुमारे तीन ते साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने दखल घेऊन सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.