Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगावातील ४५०० मालमत्ताधारकांना न्यायालयाची नोटीस
    उत्तर महाराष्ट्र

    जळगावातील ४५०० मालमत्ताधारकांना न्यायालयाची नोटीस

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावातील ४५०० मालमत्ताधारकांना न्यायालयाची नोटीस

    थकबाकी न भरल्यास होईल जप्तीची कारवाई

    जळगाव, प्रतिनिधी:

    महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांना वारंवार कर भरण्याचे आवाहन केले असतानाही अनेक जण कर चुकवत आहेत. त्यामुळे ४५०० मालमत्ताधारकांविरोधात महापालिकेने न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, २२ मार्च रोजी होणाऱ्या लोकअदालतीत या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

    जे मालमत्ताधारक २२ मार्चच्या आधी थकीत कर भरतील, त्यांच्यावरील दावे मागे घेतले जातील. थकीत कर न भरल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई होणार आहे. महापालिकेने ३०,००० रुपयांपेक्षा अधिक थकीत असलेल्या मालमत्ताधारकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

    महापालिकेने १ ते १५ मार्चदरम्यान थकबाकीदारांसाठी “अभय शास्ती योजना” सुरू केली होती, ज्यामध्ये करदात्यांना ७५% शास्ती (दंड) सवलत देण्यात आली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना २३ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. महापालिकेच्या महसूल विभागानुसार, सुमारे ४ ते ५ हजार मालमत्ताधारक अनेक वर्षांपासून कर भरत नाहीत. यामुळे – महापालिकेच्या तिजोरीत मोठी तूट निर्माण झाली आहे.
    शहराच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, सफाई यांसारख्या मुलभूत सुविधांवर मर्यादा येत आहेत.

    महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर देरे आणि महसूल उपायुक्त धनश्री शिंदे यांनी नागरिकांना तातडीने थकीत कर भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा
    जप्तीची कारवाई आणि लिलाव प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. तसेच दंडासह सक्तीने वसुली केली जाईल. थकबाकीदारांसाठी ही शेवटची संधी आहे. २३ मार्चपूर्वी थकीत कर भरून दंडमाफीचा लाभ घ्यावा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.

     

     

     

     

     

    #crime jalgaon Mahanagarpalika
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif