धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावमधील समतानगर भागात राहणाऱ्या तरुणाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

रमेश भास्कर नाडे (वय ३०, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) हा तरुण आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता तो जेवण करून घराबाहेर गेला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत तो घरी आला असल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.

दरम्यान सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे, हरीश डोईफोडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.