जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ता. २४ जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालाच्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कौस्तुव मुखर्जी, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, बीबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने कम्पर्ट झोनच्या बाहेर येत नॉलेज, अॅटीट्युड व स्कील हि त्रिसूत्री आत्मसात करायला हवी. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. विनोद महाजन, प्रा. प्रतीक्षा जैन आदींनी यांनी पार पाडली. सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. यावेळी विविध विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली तसेच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.