मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. अशातच आता पुढील 24 तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील 24 तासात राज्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे.
कोणत्या भागासाठी कोणता अलर्ट?
- नाशिक -ऑरेंज
- नंदूरबार – ऑरेंज
- मुंबई – यलो
- पुणे – ऑरेंज
- कोल्हापूर -ऑरेंज
- सातारा – ऑरेंज
- ठाणे – ऑरेंज
- रायगड – ऑरेंज
- रत्नागिरी – ऑरेंज
- सिंधुदुर्ग – ऑरेंज
राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.