धक्कादायक; भारत चीनी सैनिकांमध्ये पुन्हा झटापट…

0

 

अरुणाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा भारत (India) आणि चीनच्या (China) सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय झटापटीत दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान तवांग जिल्ह्यातील यंगस्तेमध्ये ही झटपाट झाली. प्राप्त माहितीनुसार चीन पीपुल्स लिब्रेशन आर्मी LAC पर्यंत पोहचली होती. त्यांनतर भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

तवांग जवळ ही झटापट झाली आहे. याबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा झाली होती. यानंतर दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले होते. ऑक्टोबर २०२१मध्ये अरुणाचलमधील यांगसेमध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद उफाळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.