अरुणाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:
९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा भारत (India) आणि चीनच्या (China) सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय झटापटीत दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
On 9th Dec 2022, PLA troops contacted the LAC in Tawang Sector of Arunachal Pradesh which was contested by Indian troops in a firm and resolute manner. This face-off led to minor injuries to a few personnel from both sides. Both sides immediately disengaged from the area: Sources pic.twitter.com/vQLXcM3xLS
— ANI (@ANI) December 12, 2022
दरम्यान तवांग जिल्ह्यातील यंगस्तेमध्ये ही झटपाट झाली. प्राप्त माहितीनुसार चीन पीपुल्स लिब्रेशन आर्मी LAC पर्यंत पोहचली होती. त्यांनतर भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
तवांग जवळ ही झटापट झाली आहे. याबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा झाली होती. यानंतर दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले होते. ऑक्टोबर २०२१मध्ये अरुणाचलमधील यांगसेमध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद उफाळला होता.