अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रलिया (Australia) या दोघं संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. आणि आता भारतीय संघाने हि मालिका आपल्या नावे केली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मैदानात टिकून चिवटपणे फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ कडे नेला. यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा बॉर्जर गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा हा घरातला सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे.