Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तोतया महिला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला अटक
    गुन्हे वार्ता

    तोतया महिला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला अटक

    तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा : गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2026No Comments843 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भिवंडीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापऱ्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तोतया महिलांची टोळी सक्रिय झाली होती. मागील पंधरा दिवसांपासून भिवंडीतील शांतीनगर परिसरातील हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेत्यांना ही टोळी लक्ष्य करत होती. ही टोळी स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवत शिळे, अस्वच्छ अन्न विक्री तसेच मुदतबाह्य माल विक्रीचे आरोप करत व्यापऱ्यांना धमकावत होती आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होती.

    या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सागर प्लाझा हॉटेल परिसरात धाव घेतली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच दोन महिला आणि एक पुरुष घटनास्थळांवरून पसार झाले. तरीही शांताबाई दशरथ राजपूत या महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, समशाद खान आणि जावेद मोहम्मद चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्यासह अन्य तीन साथीदारांविरोधात खंडणी उकळणे आणि तोतया अधिकारी बनून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शांताबाई राजपूत हिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. व्यापाऱ्यांनी कोणतीही अधिकृत तपासणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची ओळख पटवूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif