भाजप जर दादांवर खरोखर प्रेम करत असेल तर…

संजय राउतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे जे आरोप करण्यात आले होते, ते सिद्ध होऊ शकले नाहीत, असे राऊत यांनी म्हटले आहे. भाजप जर दादांवर खरोखर प्रेम करत असेल आणि त्यांच्याविषयी आदर बाळगत असेल, तर त्यांनी हे आरोप तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी नमूद केले की, भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः पंतप्रधान व देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप सिद्ध करण्यात भाजपला यश आले नाही. त्यामुळे आता, भाजप दादांविषयी जाहिरातींमधून व्यक्त करत असलेले प्रेम खरे असेल, तर त्यांनी पूर्वी केलेले हे सर्व आरोप मागे घ्यावे. दादांवरील हे आरोप मागे घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. हा राजकीय मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, भाजप यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.