Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना प्रचंड प्रतिसाद
    आरोग्य

    जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना प्रचंड प्रतिसाद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना प्रचंड प्रतिसाद

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.

    या अभियानाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून करण्यात आली असून समारोप महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी होणार आहे. महिलांचे आरोग्य, कुटुंबाचे सशक्तीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासण्या या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

    जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या अभियानांतर्गत विविध स्तरांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या शिबिरांना जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

    नियमित शिबिरे आयोजित : 1556
    विशेष शिबिरे आयोजित : 169
    एकूण नागरिकांचा सहभाग (Foot fall) : 2,48,438

    लाभार्थींची तपशीलवार विभागणी

    पुरुष लाभार्थी : 47,499
    महिला लाभार्थी : 2,00,939
    गर्भवती माता तपासणी (ANC) : 6,665
    लसीकरण केलेले बालक व लाभार्थी : 9,491
    एनसीडी उच्च रक्तदाब (Hypertension) तपासणी : 53,277
    एनसीडी मधुमेह (Diabetes Mellitus) तपासणी : 52,607
    शस्त्रक्रिया लाभार्थी : 236
    आयुष्मान गोल्डन कार्ड वितरण : 1,07,243
    रक्तदान शिबिरातील रक्तदाते : 192

    अभियानातील विशेष तपासण्या व उपक्रम

    या कालावधीत आयोजित शिबिरांमध्ये सर्वसामान्य तपासण्यांसोबतच नागरिकांसाठी विविध महत्त्वाच्या विशेष तपासण्या आयोजित करण्यात आल्या.

    गरोदर माता तपासणी (ANC)
    बालकांचे व गरोदर मातेचे लसीकरण सत्रे
    संसर्गजन्य आजार तपासणी
    क्षयरोग तपासणी (TB Screening)
    ॲनिमिया तपासणी
    सिकलसेल आजार तपासणी
    नेत्र तपासणी (डोळ्यांचे आजार तपासणी व मोतीबिंदू निदान)
    कर्करोग तपासणी (स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, तसेच इतर तपासण्या)
    रक्तदान शिबिरे
    आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरण

    अभियानाचे महत्त्व

    या अभियानामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांच्या आरोग्य तपासण्या झाल्या.

    महिलांच्या आरोग्य तपासण्या, गर्भवती मातांची निगा व बालकांचे लसीकरण या उपक्रमांतर्गत बळकटीस आले.

    एनसीडी म्हणजेच उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणीमुळे नागरिकांमध्ये रोग ओळख आणि नियंत्रणाबाबत जागरूकता वाढली.

    पीएम-जय योजना कार्डांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाल्याने गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

    रक्तदान उपक्रमांमुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांचा साठा वाढीस लागला.

    जिल्हा आरोग्य विभागाचा प्रभावी अंमल

    या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आशा, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवी संस्था यांचा मोलाचा सहभाग राहिला. आरोग्यसेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आरोग्य विभागाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

    जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारामुळे 2 लाख 48 हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचल्या हे या अभियानाचे विशेष यश ठरले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif