नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांमध्ये देशांमध्ये नाचता-गाता, उठता-बसता, चालता-बोलता अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची बरीच घटना समोर आल्या आहेत. किती तरी जणांचा यात मृत्यू झाला आहे.
या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. अचानक हार्ट अटॅकची प्रकरणं का वाढली, हा सर्वांना पडलेला प्रश्न. तज्ज्ञ डॉक्टरांनी यामागील कारणे सांगितलीच आहेत. पण आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही यावर उत्तर दिले आहे.
नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सहभागी झाले. देशातील अचानक हार्ट अटॅक प्रकरणांबाबतही ते रायझिंग इंडियाच्या मंचावर बोलले.याप्रकरणी आयसीएमआर तपास करत आहे.
दोन महिन्यांत याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.यंदाचा विषय आहे ‘द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया’. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.