जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीमधून अनेक नेते अजित पवार गटात जात आहे. जळगाव जिल्ह्यातून सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात जाणार असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.
त्यांचे लफडे बंद
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अक्षय तृतीयानिमित्ताने राज्यभरातील जनतेला खान्देशची बोलीभाषा असलेल्या अहिराणी भाषेत गण म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी यावेळी जोरदार राजकीय हल्लाबोल केलाय. खानदेशात सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेशाबद्दल गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे. प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जाताहेत हे आख्या जगाला माहिती आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.
मोठा खुलासा
मजूर फेडरेशन मधील घोटाळा जिल्हा बँकेतून पाच कोटींचे घेतलेले कर्ज प्रकरण यामुळे ते अडचणीत आहेत. निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली आहे, त्यामुळे ते अडचणीत आहे, त्यानी जी घाण केली आहे ती साफ करण्याकरिता ते जाताहेत. अजितदादा छाती ठोक पाने म्हणतात की माणसं तपासून घेईल. फार सुंदर माणसं त्यांनी तपासून घेतले आहे त्या देवकर यांच्या सारखे, असा घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. अजितदादांना पुढच्या काळात लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता, असे सांगायला ते विसरले नाहीत. गुलाबराव देवकर यांनी आपण घोटाळा केला नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता सहा महिने का तोंड बंद होते. एकनाथ शिंदे यांना भेटायचे वेळी कुठे झोपलेले होते. माझ्याबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवकर यांचे बैठक झाली असा मोठा खुलासा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा यांच्यावर निशाणा साधला आहे आहे.