Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका
    जळगाव

    “त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

    आमच्‍या सोबत राहून निवडून आले. परंतु आमच्या पाठीत शिवसेनेने (Shivsena) खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसला (Congress) जाऊन मिळाले. मात्र याचे फळ शिवसेनेला भोगावे लागत आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार व 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेल्‍याचे देखील महाजन यांनी सांगितले.

    फळे भोगावीच लागणार 

    मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमच्‍या सोबत राहून निवडून आले. परंतु आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंची शिवसेना फितूर झाली. त्यामुळे ठाकरेंनी जे केलं आहे त्याची फळ त्यांना भोगावीच लागणार आहेत, असा इशारा महाजन यांनी दिला.

    शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या 

    आमदार, खासदार फुटल्‍यानंतर मोठा उठाव झाला. शिवसेना कोणाची यावर प्रश्‍नचिन्‍ह उभे राहून नावासाठी, चिन्हासाठी भांडले, आत ते मैदानासाठी भांडत होते. तर काही दिवसांनी शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या करतील अशी बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

    तसेच महाजन म्हणाले की, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत खरी शिवसेना आमची असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेते पदासोबतच पक्ष, पक्षाच्‍या चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

    #bjp #ncp #shivsena Congress Girish Mahajan on Uddhav Thackeray Jamner Minister Girish Mahajan Political news uddhav thackeray
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif