गंगा नदीत पाच विद्यार्थी बुडाले !

0

 

बदायूं , लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशातील बदायूं येथील कचला गंगा घाटावर पाच विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून २ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.

हे सर्व विद्यार्थी बदायूं मेडिकल कॉलेजचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व जण बदायूंच्या कचला गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. यामध्ये प्रमोद यादव, प्रकाश मौर्य, पवन यादव, नवीन सिंघल व अंकुश गेहलोत हे स्नान करू लागले. मात्र अचानक ते खोल पाण्यात बुडू लागले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने तात्काळ नदीतील विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण विद्यार्थ्यांना वाचवण्यात अपयश आले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उजनी कोतवाली परिसरातील कचला गंगा घाटात ही घटना घडली.

कचला गंगा घाटावर पोहोचल्यानंतर डीएम मनोज कुमार यांनी तपासणी करून घटनेची माहिती घेतली आहे. डीएमने सांगितले की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.