Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    • जेष्ठ्य अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»फ्री…फ्री…फ्री… ‘फुकट’ आश्वासनांचा महापूर
    राष्ट्रीय

    फ्री…फ्री…फ्री… ‘फुकट’ आश्वासनांचा महापूर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 9, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    निवडणुका जिंकण्यासाठी मोफत योजना जाहीर करणे राजकीय पक्षांची लोकप्रिय रणनीती बनली आहे. या योजनांच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही रणनीती निवडणूक यशाकडे घेऊन जात असली तरी त्याचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. या रणनीतीचे फायदेही दिसून आले असून महाराष्ट्र त्याचे ताजे उदाहरण आहे.

    निवडणुकीपूर्वी भाजप युतीने 2.5 कोटी महिलांसाठी 1,500 रुपये मासिक आर्थिक मदत कार्यक्रम जाहीर केला ज्याचा उद्देश ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील मतदारांचा पाठिंबा वाढवण्याचा होता. या योजनेचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर स्पष्टपणे दिसून आला. याच घोषणेच्या जोरावर भाजप आणि मित्रपक्षाने मोठा विजय मिळवला ज्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता दिल्ली सरकारही राज्यातील महिलांना दरमहिना मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेच्या योजनेंतंर्गत एक हजार रुपये देण्याची योजना आखत आहे. त्याचबरोबर या योजनेवर दरवर्षी 4,560 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे वित्त विभागाने म्हटले आहे. तसेच यामुळे दिल्ली सरकारच्या बजेटवर मोठा भार पडणार असून निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा योजना जाहीर करणे तज्ज्ञांना चांगले वाटत नाही. या योजनांचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

    अर्थसंकल्पात तूट आल्यास केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागू शकतो, अशी भीती वित्त विभागाने व्यक्त केली. यामुळे दिल्ली सरकारची आर्थिक स्वायत्तता कमी होऊ शकते. दिल्ली सरकार इतर राज्यांप्रमाणे बाजारातून कर्ज घेऊ शकत नाही, त्यांना नॅशनल स्मॉल सेव्हिंग्ज फंडातून कर्ज घ्यावे लागते, जे महाग आहे. दिल्ली जल बोर्डाला 2,500 कोटी रुपयांचे अनुदानही दिले जाणार असून या सर्वांमुळे 2025-26 या आर्थिक वर्षात 7,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यांतील निवडणुकांपूर्वी अशा योजना जाहीर केल्याने सत्ताधारी पक्षांना फायदा झाल्याचे उदाहरण आपल्या समोर असून महाराष्ट्रातील स्थिती ताजे उदाहरण आहे.

    free
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif